राग राग धरून तरी आपल्याला जायचं कुठं

राग राग धरून तरी आपल्याला जायचं कुठं, देवाघरचं बोलावनं आलं की इथं थांबता यायचं तरी कुठं..!
बोलावं माणसानं सवींशी अभिमान सोडून, करावा आदराने नमस्कार थोडा जरा वाकून..!
चार चौघांशी माणसानं आपलेपण जपावं, परतीच्या प्रवासाला खांदा देणारं कुणीतरी आपल्या जवळचं असावं..!
अहंकाराचा वारा कधीच जपू नये उराशी, घात करेल तो आपला तोडेल नाते जनमानाशी..!
एकजुटीने वागण्यातच खरा शहाणपणा आहे, कुटुंबव्यवस्था हेच तर आपले खरे प्रतिबिंब आहे..!
माणसाने माणसाशी एकजुटीने वागावं, 7 सरणावर हृदयातून रडायला कुणीतरी आदिल असावं..!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *